Friday, August 7, 2009

महान राजा : कृष्णदेवराय



कृष्णदेवरायाच्या पराक्रमाचे वर्णन केवळ एकाच बाबीने
प्रभावीपणे करता येईल. 19 वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत
कृष्णदेवरायाने 38 युद्धे लढली आणि जिंकली.

एकविसाव्या शतकातल्या पहिल्या दशकाचा उंबरठा येत्या वर्ष-दीड वर्षातच आपण ओलांडू. 2010 ते 2020 हे दशक भारताच्या दिग्विजयी सामर्थ्याची मुहूर्तमेढ रोवणारे ठरावे असे स्वप्न आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी समस्त भारतवासीयांसमोर विशेषत: तरुणाईसमोर ठेवले आहे. कलामांची ही आकांक्षा केवळ कल्पनारम्य स्वप्नरंजन ठरवायचे की, तिच्यातील क्रांतदर्शित्वाला प्रत्यक्ष साकार करायचे, याचा विचार अर्थातच तरुण पिढीने करायचा, पण स्वत: अब्दुल कलाम यांचा मात्र ठाम विश्वास आहे, तोे भारतीय युवावर्गाच्या ठायी असलेल्या प्रचंड सुप्तशक्तीवर. विश्वविजयी भारताचे स्वप्न साकार करण्याचे सामर्थ्य इथल्या तरुणांच्या मनात, मनगटात निश्र्चितच आहे, पण त्या "सुप्त' असलेल्या शक्तीच्या जागराचा हुंकार बुलंद व्हायला हवा, पुरुषार्थ जागविला जायला हवा. याच संदर्भात 7 ऑगस्ट 1509 या दिवसाचे स्मरण. काय घडले त्या दिवशी ? पाचशे वर्षांचा प्रदीर्घ काळ उलटून गेल्यानंतरही त्याविषयीच्या स्मृती जागवाव्यात, असे काय वैशिष्ट्य आहे त्या दिवसाचे? ते समजून घेण्याआधी जरा त्या काळच्या इतिहासाकडे एक ओझरती नजर टाकू.
इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीचा जन्म होण्यापूर्वी हजारो वर्षांपासून या भरतभूमीत अत्यंत प्रगल्भ आणि प्रगत संस्कृती पिढ्यान्‌पिढ्या नांदत होती. जगाच्या पाठीवर अलौकिक असलेल्या नैसर्गिक वरदानाला आपल्या सखोल चिंतनाची जोड देऊन येथील ऋषी-मनीषींनी येथे अत्यंत प्रगल्भ नागरी जीवनाची सुदृढ परंपरा निर्माण केली होती. साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, स्थापत्य, शिल्प आदी सर्वच क्षेत्रांत अत्यंत वैभवशाली समाज येथे स्थिरतेने आणि समाधानाने जगत होता. जगात अन्यत्र मानवजात अद्यापही जंगली जीवन जगत असताना येथे सुसंस्कृतीच्या सरिता दुथडी भरून वाहत होत्या. याच वैभवाच्या आकर्षणाने, ती समृद्धी ओरबाडण्यासाठी आक्रमकांच्या टोळधाडी 8 व्या शतकापासून या भूभागावर बरसू लागल्या होत्या. शक, हूण, कुषाण, यवन, पठाण अशा आक्रमणकारी टोळ्यांच्या लाटा एकामागून एक येथे धडका देऊ लागल्या. या आक्रमकांशी कडवी झुंज देणारे पराक्रमी सम्राटही येथे एकामागून एक निपजले. मौर्य, गुप्त सम्राट, राणा संग, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान अशा कितीतरी योद्ध्या सम्राटांची नावे घेता येतील. याच यादीत दक्षिण भारताच्या इतिहासात एक नाव ठळकपणे झळकते, ते विजयनगरचे साम्राज्य आणि तेथील सम्राट कृष्णदेवराय यांचे. याच कृष्णदेवराय यांच्या राज्याभिषेकाला 7 ऑगस्ट 2009 रोजी पाचशे वर्षे पूर्ण होत आहेत.
वयाच्या चौतिसाव्या वर्षी, 1509 साली कृष्णदेवराय विजयनगरच्या गादीचे अभिषिक्त सम्राट बनले. तिथून पुढे 19 वर्षे विजयनगरची सर्वांगाने भरभराट होत राहिली. कृष्णदेवराय केवळ एक झुंझार सेनानीच होता असे नव्हे तर, बहुश्रुत विद्वान, श्रेष्ठ दर्जाचा कवी आणि साहित्यिक होता. तेलुगु आणि संस्कृत भाषेतील त्याच्या साहित्यकृती ख्याती पावलेल्या आहेत. "अमुक्त माल्यदा' हे महाकाव्य म्हणजे कृष्णदेव राजाची सर्वोत्कृष्ट ग्रंथनिर्मिती समजली जाते. या महाकाव्यात त्याने राज्यशास्त्राच्या विविध पैलूंची चिकित्सक मीमांसा केली आहे. राजाचे वर्तन कसे असावे, त्याने आपल्या अधिकाऱ्यांची निवड कशी करावी, मंत्रिमंडळ कसे बनवावे, दोषी व्यक्तींना शासन करताना काय धोरण बाळगावे, धनसंपत्तीचा विनियोग कसा करावा, व्यापारउदिमाला कशी चालना द्यावी, जंगले कुठे आणि कशी जोपासावीत, परदेशी व्यापाऱ्यांना कसा आणि किती वाव द्यावा, अशा विविध महत्त्वाच्या बाबींची अतिशय सूक्ष्म चर्चा "अमुक्त माल्यदा' या महाकाव्यात केलेली आढळते.
स्वाभाविकच राजाच्या कारकीर्दीत कला-साहित्य-संस्कृतीलाही वैभव प्राप्त झाले. मध्ययुगीन भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक वैभवशाली पर्व असे कृष्णदेवरायाच्या कारकीर्दीचे वर्णन केले जाते. "ज्ञानचिंतामणी' हे तत्त्वज्ञानावरील पुस्तक, "जाम्बवती कल्याणम्‌' हे नाटक, "रसमंजिरी' हा अलंकारांसंबंधीचा ग्रंथ, "मदालसाचारित्र' हा चरित्रग्रंथ अशी विविध साहित्य प्रकारातील निर्मिती कृष्णदेवरायाने केली. म्हणून तत्कालीन शिलालेखांतून त्याचा "काव्य-नाटक-अलंकार मर्मज्ञ' तसेच "साहित्यसमर अंगना सार्वभौम' (म्हणजेच युद्धाप्रमाणेच साहित्यातील योद्धा) अशा गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख आहे. त्याच्या कारकीर्दीत दक्षिण भारतातल्या चारही भाषांमधून मौल्यवान साहित्यनिर्मिती झाली. त्याचबरोबर संगीत, नाट्य, नृत्य, वास्तुशिल्प, चित्रकला या सर्व कलांच्या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण विकास घडून आला.
राजनीती आणि युद्धशास्त्र यांच्या बाबतीत तर कृष्णदेवरायाच्या अंगी कमालीचे नैपुण्य होते. एका विलक्षण योगायोगाचा येथे उल्लेख करायला हवा. राजा कृष्णदेवरायही स्वतःला गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवून घेत असे. सर्वसामान्यजन, पशुधन, निसर्गसंपत्ती यांचे जतन आणि संवर्धन करण्याची तसेच सीमांचे रक्षण कसोशीने करून प्रजाजनांना निर्भय व निर्वेध जीवन जगता येईल अशी कडेकोट व्यवस्था करणारा चतुरस्त्र राजा असा या बिरुदावलीचा व्यापक अर्थ आहे. या पदवीला सर्वार्थाने सार्थ ठरविणारी प्रगल्भ बुद्धिमत्ता, बहुश्रुतपणा, मुत्सद्दीपण आणि प्रशासनिक कार्यक्षमता या साऱ्या गुणसंपदेचा दुर्मिळ संगम कृष्णदेवरायाच्या ठायी झाला होता.
कृष्णदेवरायाच्या पराक्रमाचे वर्णन केवळ एकाच बाबीने प्रभावीपणे करता येईल. 19 वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत कृष्णदेवरायाने 38 युद्धे लढली आणि जिंकली. राज्याच्या सीमांचे संरक्षण, आक्रमणांचा प्रभावी आणि यशस्वी प्रतिकार आणि पराक्रमाच्या बळावर सीमाविस्तार यांच्या कुशल अवलंबाच्या आधारे कृष्णदेवरायाने एक बलदंड राज्य विजयनगरच्या साम्राज्याच्या रूपाने दृढमूल केले. त्याने घातलेला सार्वभौमत्वाचा हा पाया इतका भक्कम होता की, त्याच्या मृत्यूनंतरही जवळ जवळ दीडशे वर्षे विजयनगरचे साम्राज्य टिकून राहिले.
कृष्णदेवरायाच्या कारकीर्दीतील बहुधा सर्वात मोठी युद्धमोहीम 1520 साली आखली गेली. विजापूरच्या आदिलशाहीतील अत्यंत अभेद्य असलेल्या रायचूरच्या किल्ल्यावरच कृष्णदेवरायाच्या सैन्याने स्वारी केली. या स्वारीला निमित्त घडले ते असे ः कृष्णदेवरायाने आपल्या सिद्दी सरकार नावाच्या सेनानीला उत्तम घोडे आणण्यासाठी संपत्ती देऊन गोव्याला पाठविले, पण सिद्दी सरकार फितूर झाला आणि सोबतची संपत्ती घेऊन आदिलशहाला जाऊन मिळाला. यावर केवळ हात चोळत बसणे मंजूर नसलेल्या कृष्णदेवरायाने आदिलशहावर जबरदस्त प्रत्याघात करायचे ठरविले. आपल्या पराक्रमाचा आणि जागरुकतेचा दबदबा यायोगे थेट आदिलखानाच्या दरबारात दुमदुमून टाकावा आणि फितुरीच्या प्रवृत्तीला निर्णायक धडा शिकवून जरब बसवावी हा त्यामागील हेतू असावा.
कृष्णा आणि तुंगभद्रा यांच्या संगमालगतच्या दोआबी प्रदेशात वसलेला रायचूरचा किल्ला अत्यंत मजबूत होता. 8000 पायदळ, 400 घोडदळ, 20 हत्ती आणि 200 तोफा अशी भरभक्कम शिबंदी या किल्ल्याच्या रक्षणार्थ सदैव तैनात असे. अणीबाणीच्या काळात किमान 5 वर्षे पुरेल एवढा धान्यसाठा या किल्ल्यात होता. भरपूर तलाव आणि विहिरी असल्याने पाणीपुरवठ्याचीही चिंता नव्हती. अशा कडेकोट किल्ल्यावर चढाई करणे हे साधेसोपे काम नव्हते, पण कृष्णदेवरायासारख्या धुरंधर सेनानीजवळ साहसी वृत्तीची कमतरता नव्हती आणि वीरश्रीने रसरसलेली त्याची सेनाही तशीच बलाढ्य होती. या स्वारीत कृष्णदेवरायाने सोबत घेतलेल्या सैन्याची आकडेवारी आजही आश्चर्याने थक्क करून टाकणारी आहे. या सैन्यात 4 लाख 31 हजार पदाती (पायदळ), 20 हजार स्वारांचे घोडदळ, 226 हत्तींचे दल आणि त्यात भर म्हणून 30 हजार निष्णात तिरंदाजांची सेना एवढे विशाल सैन्यदल घेऊन कृष्णदेवरायाने रायचूरच्या किल्ल्याला वेढा घातला. इ.स.1520 च्या मार्च महिन्यात घातलेल्या या वेढ्याशी आदिलशहाची सेना जेमतेम दोन महिने झुंज देऊ शकली. 19 मे 1520 रोजी किल्ला शरण आला आणि कृष्णदेवरायाने आपला विजयध्वज त्या किल्ल्यावर रोवला.
एक उत्तम प्रजाहितदक्ष शासक, अष्टावधानी राजा, राष्ट्रनिर्मितीचे उत्तुंग स्वप्न उराशी बाळगणारा आणि ते साकार करण्यासाठी आवश्यक ती सारी व्यूहरचना कुशलतेने उभी करणारा सेनानायक, मुत्सद्देगिरीचा मानदंड आणि अत्यंत प्रगल्भ साहित्यकार कृष्णदेवराय याची 19 वर्षांची कारकीर्द हे हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील एक झळाळते सुवर्णपृष्ठ आहे. 1528 साली कृष्णदेवरायाचे निधन झाले वयाच्या 53 व्या वर्षी. पुढे दीडशे वर्षांनंतर महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे सोनेरी स्वप्न साकार करणारे महाप्रतापी छत्रपती शिवाजी महाराज आणि कृष्णदेवराय यांच्या व्यक्तिमत्त्वात, पराक्रमात, दृष्टिकोनात आणि राष्ट्रनिर्मितीच्या कर्तृत्वात असंख्य साधर्म्यस्थळे पाहावयास मिळतात. आणखी एक विलक्षण योग पहा, 1528 साली कृष्णदेवराय निधन पावले पण विजयनगरचे साम्राज्य बुलंदपणे उभे राहिले. त्याचा पाडाव करण्यासाठी बलदंड आक्रमकांनाही सतत दीडशे वर्षे धडका द्याव्या लागल्या. 1674 साली विजयनगरच्या साम्राज्याचा अस्त झाला, पण नेमक्या त्याच वर्षी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने हिंदवी स्वराज्याची विजयपताका फडकत ठेवली. दक्षिण दिग्विजयाची पताका निरंतर तेजाळत राहावी, अशी नियतीचीच इच्छा असावी.
- अरुण करमरकर , ठाणे
sahavedana@gmail.com

९३२१२५९९४९

for more details pl see

http://en.wikipedia.org/wiki/Krishnadevaraya

हिंदवी स्वराज्याचा संस्थापक -कृष्णदेवराय



7 ऑगस्ट 1509 विजयनगर साम्राज्याधिपती श्रीकृष्णदेवरायाचा "राज्याभिषेक' दिवस. हिंदवी स्वराज्याची संकल्पना सर्वप्रथम उरी बाळगणारा,
"गो-ब्राह्मण प्रतिपालक' बिरुदावली सार्थ करणारा, दक्षिणेतला शस्त्र आणि शास्त्र निपुण धुरंधर सम्राट-श्रीकृष्णदेवराय।


बरोबर आजला पाचशे वर्षांपूर्वी हा राजा होऊन गेला. "सकल कला संपन्न, शस्त्रतेजाने शत्रूंना धूळ चारणारा, काव्यगुणाने प्रतिभावंतांना पोसणारा, उत्तम राज्यकर्त्याचे धडे आपल्या ग्रंथलेखनातून भारतीयांच्या पुढे ठेवणारा सम्राट म्हणून कृष्णदेवरायाचं नाव इतिहासात चिरस्मरणीय आहे.
"विजयनगर साम्राज्य' म्हणजे भारतीय हिंदूू संस्कृतीचा, हिंदवी स्वराज्य स्थापनेचा "महोन्नत महामेरू' म्हणून ओळखला जातो. धर्म, संस्कृती, कला आणि साहित्य यासंदर्भात या साम्राज्याचे फार मोठे योगदान आहे. या साम्राज्याच्या कुलवंशातल्या सर्व सम्राटांत कृष्णदेवराय हा एक अतुलनीय असा दिग्गज सम्राट होऊन गेला. याच्या कारकीर्र्दीत विजयनगरची सेना दिग्विजयी गणली गेली. श्रीचैतन्य महाप्रभू, वल्लभाचार्य, संत कनकदास, संत पुरंदरदास आदी महापुरुषांना या सम्राटाने सन्मानित केले आहे. प्रख्यात माध्वाचार्य श्री व्यासतीर्थ हे त्याचे गुरुदेव होत.
विजयनगरपासून बेळगाव, गोवा, कटक ते श्रीलंकेपर्यंत याने आपले साम्राज्य विस्तारले. आपला वराहचिन्हांकित यशोध्वज सदा फडकावीत ठेवला. नाट्य, संगीत, शिल्प, शौर्य आणि साहस या संदर्भात याचे कार्य अद्‌भूतच म्हणावे लागेल असे होते.
कन्नड, तेलुगू, तामिळ आणि संस्कृत या विविध भाषांतून त्याने मनोज्ञ असे ग्रंथ लेखन केले. आंध्रचा "भोजराजा' म्हणून कृष्णदेवरायाची ख्याती भारतीय इतिहासात मुद्रित. या सम्राटाच्या दरबारात प्रतिभासंपन्न अष्टदिग्गज कवीगण होते. "तेलुगू कालीदास' म्हणून सर्वश्रुत असलेल्या "श्रीनाथ' कवीची याने सुवर्णतुला केली. आपल्या कारकीर्दीतल्या अवघ्या एकोणीस वर्षांत या सम्राटाने अडोतीस लढाया केल्या आणि त्या सर्व जिंकल्या. विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बिदरशाही, अहमदनगरची निजामशाही या साऱ्यांना चळचळा कापायला लावणारा हा एक शूर योद्धा होता. शत्रूंना आपल्या सीमेपर्यंत येऊ न देता, स्वत:हून शत्रूंचे दार ठोठावणारा हा एक हिंदवी स्वराज्य निर्माणकर्ता राजा होता. कृष्णदेवरायाने लिहिलेल्या काव्यग्रंथांपैकी "अमूल्य माल्यदा' हे काव्य तेलुगूतल्या सर्वश्रेष्ठ अशा पंचकाव्यातले एक होय. एकंदरीत शस्त्र आणि शास्त्र याच्यावर अभूतपूर्व हुकुमत गाजवणारा असा दुसरा सम्राट झाला नाही, हे विधान तीळमात्र अतिशयोक्तीचे नाही.
भारतीय इतिहासकारांनी कृष्णदेवरायांच्या कर्तृत्व पराक्रमाची तुलना प्रभू श्रीराम, धर्मराज, चंद्रगुप्त, विक्रमादित्य, पुलकेशी या दिग्गज नरपुंगवाशी केली आहे. हा जरी श्रीकृष्णदेवरायाचा दैदिप्यमान इतिहास असला तरी त्याच्या पुढच्या सम्राटांकडून मात्र घोर निराशा झाली. श्रीकृष्ण देवरायाची ताकद त्यानंतर झालेल्या सम्राटांना पेलवली नाही. इ.स. 1929 साली श्रीकृष्णदेवराय यांनी आपली सम्राटपदाची धुरा आपले चुलत बंधू अच्युतरायावर सोपवली. त्यानंतर तिरूमला, रामराजा, वेंकटाद्रि असे सम्राट होऊन गेले. हे सारे व्यसनी आणि दुर्बल निघाले.
ज्या श्रीकृष्णदेवरायाने विजापूरच्या आदिलशहाला सळो की पळो केले, खुद्द आदिलशहाच्या राजधानीत तळ ठोकून तीन महिने मुक्काम केला. ज्या धर्मवेड्या आदिलशहाकडून गुलबर्ग्याचे शिवेश्र्वर मंदिर भ्रष्ट झाले. त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्याला शुचिर्भुत कार्य केले, ज्या हिंदूंना सक्तीने मुसलमान केले गेले त्या सर्वांना त्यांनी विधीयुक्त पुन्हा आपल्या हिंदू धर्मात घेतले. अशा हिंदवी स्वराज्य निर्माता कृष्णदेवरायाचे वारसदार कर्तृत्वशून्य निघाले. ज्या धर्मलंड आदिलशहाला कृष्णदेवरायाने अद्दल घडवली, त्याचेच वारसदार पुढे आदिलशहाच्या ताटाखालचे मांजर बनले.
हिंदवी स्वराज्याचा स्वाभिमानी कणा मोडण्यासाठी सारी यवनी राजवट एकवटली. विजापूरचा आदिलशहा, अहमदनगरचा निजामशहा, गोवळकोंड्याचा कुतुबशहा ही सारी मंडळी आपापसातली भांडणतंटे बाजूला ठेवून, हिंदवी स्वराज्याचा नि:पात करण्यासाठी एक झाले. त्यांनी जिहाद पुकारून, आपापले सारे सैन्य एका छत्राखाली आणून विजयनगर साम्राज्यावर तुटून पडले आणि विजयनगर साम्राज्याचा दारूण अस्त घडवून आणला. जगाला चकित करणारी मनोरम शिल्पे, भव्य मंदिरे या यवनांनी छिन्नविछिन्न केली. आज त्या भग्न अवशेषातूनही श्रीकृष्णदेवरायाच्या कलासक्त मनाचे संपन्न कर्तृत्व दिसून येते. आजही असंख्य पर्यटक कृष्णदेवरायाच्या या विजयीनगरीला अभिवादन करण्यासाठी शिल्पचतुराई जोखण्यासाठी गर्दी करून जातात.
श्रीकृष्णदेवरायाच्या राज्यकर्तृत्वाचे गुणगान लोकमान्य टिळकांनी सुद्धा गाईले आहे.
लोकमान्य टिळक इंग्लंडला डेप्युटेशन घेऊन जात असताना मद्रास येथील आंध्रमंडळींनी "गोखले हॉल'मध्ये त्यांना एक मानपत्र अर्पण केले. त्यास उत्तर देताना लोकमान्य टिळक म्हणाले, ""मी आज रोजी आंध्र आणि मराठे या उभयतांना अशाकरिता एकत्र करीत आहे की, राजकीय सुधारणेची तत्त्वे जी मराठी राज्यकर्त्यांनी उचलली ती सर्व विजयनगर येथील आंध्र राजांकडूनच होय. म्हणून आम्ही मराठे तुमच्या आंध्र लोकांचे एकप्रकारे ऋणी आहोत. शिवाजी महाराजांनी व त्यांच्यामागून मराठे राजमंडळांनी जी राज्यव्यवस्था केली ती विजयनगरच्या राज्यव्यवस्थेप्रमाणेच होती.'' (मुंबई तेलुगू समाचार- संक्रांती पुरवणी इ.स. 1950)
आश्चर्य म्हणजे ज्या हिंदवी स्वराज्य निर्माणकर्त्या विजयनगर साम्राज्याचा अस्त 1674 साली झाला, त्याच वर्षी रायगडावर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि पुनश्च एकदा हिंदवी स्वराज्याची विजयीपताका फडकत राहिली। अस्तु!

डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली
भ्र. :9850074141

Friday, July 17, 2009

राष्ट्रीय पत्रकार पुरस्कारांची निवड जाहीर

राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यासाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पत्रकार पुरस्कारांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
यावर्षी स्व. बापूराव लेले स्मृती पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार दु. गु. लक्ष्मण, संपादक, होसा दिगंत - बंगळूरू/मंगलोर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच स्व. दादासाहेब आपटे छायाचित्र पुरस्कारासाठी छायाचित्रकार प्रकाश जाधव, पुणे - बिझीनेस इंडिया यांची तर स्व. शांताबाई परांजपे महिला पुरस्कारासाठी मंजिरी चतुर्वेदी-वानखेडे, दै. नवभारत टाईम्स यांची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कारांची निवड करण्यासाठी प्रथेप्रमाणे तीन तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली होती. देशभरातून आलेल्या एकूण सुमारे 20 प्रस्तावांमधून समितीने सर्वमतांनी यावर्षीच्या पुरस्कर्त्यांची निवड केली आहे.
न्यासातर्फे गेल्या 6 वर्षांपासून हे पुरस्कार देण्यात येत असून आतापर्यंत विविध गावी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावर्षी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सहयोगाने हा कार्यक्रम 8 ऑगस्ट रोजी सोलापूर येथे होणार आहे. राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यासातर्फे पत्रकार प्रशिक्षण, प्रबोधनाचे विविध उपक्रम देशाच्या विविध भागात आयोजित करण्यात येतात. पत्रकारितेबाबतची विविध प्रकाशने तसेच पत्रकार साह्यार्थ वेगवेगळ्या प्रकारची योजना करण्याचा न्यासाचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत चार रूग्ण पत्रकारांना यथाशक्ती आर्थिक अनुदान देण्यातही आले आहे.

आपला स्नेहांकित,
अरुण करमरकर
9321259949

Sunday, June 28, 2009

न्यायप्रणालीची स्वच्छता मोहीम!

न्यायप्रणालीच्या स्वच्छतेची गुजरातमध्ये हाती घेण्यात आलेली मोहीम लोकांच्या मनात धडकी भरविणारी ठरली असली, तरी संपूर्ण राज्यात, नव्हे देशभरात ही मोहीम कौतुकास्पद ठरत आहे. सर्वदूर त्याचे स्वागत होत आहे. सामान्य माणूस ज्या व्यवस्थेकडे मोठ्या आदराने, आशेने बघतो त्या न्यायव्यवस्थेच्या शालीनतेचे, पवित्रतेचे, विश्वसनीयतेचे निघालेले वाभाडे क्लेशदायक ठरले आणि या प्रकरणात गांभीर्याने पावले उचलण्याचा निर्णय सरकारने घेतला. गुजरातचे उच्च न्यायालय ठामपणे सरकारच्या पाठीशी उभे ठाकले आणि मग सुरू झाली या प्रणालीची "स्वच्छता मोहीम!'

विकासाच्या माध्यमातून एका नव्या युगाकडे सध्या गुजरातचा प्रवास सुरू आहे. या प्रवासात समाजाच्या सर्वच क्षेत्रांना स्पर्श करीत सामाजातील वाईट प्रवृत्तींना आळा घालण्याचा प्रयत्न प्रामुख्याने होतोय्‌. यात पोलिस आणि न्यायव्यवस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेता, त्याही क्षेत्रात दखलपात्र उपाययोजना, कठोर निर्णयांची अंमलबजावणी राज्य सरकारच्या पुढाकाराने केली जात आहे. कधी त्यासाठी मोक्काच्या धर्तीवर गुजरात सरकारने तयार केलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी प्रकर्षाने नोंदविली जाते, तर कधी न्यायालयात कार्यरत न्यायाधीशांवरही या कारवाईचे गंडांतर येते. पण न्यायप्रणालीच्या स्वच्छतेची गुजरातमध्ये हाती घेण्यात आलेली मोहीम लोकांच्या मनात धडकी भरविणारी ठरली असली, तरी संपूर्ण राज्यात, नव्हे देशभरात ही मोहीम कौतुकास्पद ठरत आहे. सर्वदूर त्याचे स्वागत होत आहे. सामान्य माणूस ज्या व्यवस्थेकडे मोठ्या आदराने, आशेने बघतो त्या न्यायव्यवस्थेच्या शालीनतेचे, पवित्रतेचे, विश्वसनीयतेचे निघालेले वाभाडे क्लेशदायक ठरले आणि या प्रकरणात गांभीर्याने पावले उचलण्याचा निर्णय सरकारने घेतला. गुजरातचे उच्च न्यायालय ठामपणे सरकारच्या पाठीशी उभे ठाकले आणि मग सुरू झाली या प्रणालीची "स्वच्छता मोहीम!'
मे महिन्यात गुजरातच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी एक कठोर निर्णय घेत, तितक्याच कठोरतेने त्याची अंमलबजावणी करीत, एका क्षणात कनिष्ठ न्यायालयातील 17 न्यायाधीशांना सक्तीची सेवानिवृत्ती घ्यायला लावली. काही न्यायाधीशांची विभागीय चौकशी सुरू झाली. काहींवर निलंबनाची कारवाई झाली. ही मोहीम अद्याप थांबलेली नाही. थांबण्याचा प्रश्नच नाही, आता कुठे ती सुरू झाली आहे. न्यायाधीशांची कार्यक्षमता, त्यांची आचारसंहिता, त्यांचा प्रमाणिकपणा, सचोटी या सर्वच बाबतीत राज्याच्या न्यायप्रणालीत कुठे काय सुरू आहे, हे तपासण्याची धडक मोहीम सध्या संपूर्ण गुजरातमध्ये सुरू आहे. न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराबाबतची चर्चा आता दबक्या आवाजात होत नाही. साऱ्या देशाला ठावूक असलेले ते एक उघड सत्य आहे. ही स्थिती बदलण्याचा निर्धार गुजरात सरकारने केला. असा निर्धार करणारे आणि त्या दिशेने पावले उचलत कार्यवाही करणारे गुजरात हे देशातले पहिले आणि एकमेव राज्य असावे कदाचित! ज्यांना पदावरून हटविण्याचा निर्णय झाला, ज्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला गेला, त्या न्यायाधीशांचे, त्यांच्या भ्रष्ट वर्तणुकीचे किस्से अफलातून आहेत. कनिष्ठ न्यायालयातील एक न्यायाधीश सुनावणी करताना दिलेल्या तारखा बदलण्यासाठी थेट रेकॉर्डमध्येच बदल करायचे! ही बदललेली तारीख फक्त एकाच पार्टीला माहीत असायची आणि दुसऱ्या पक्षाच्या अनुपस्थितीत प्रकरणाची सुनावणी आणि निकाल जाहीर व्हायचे. एक न्यायाधीश अशिलांकडून त्याला हवा तसा निर्णय लावून देण्यासाठी आपल्या, वकील असलेल्या बायकोच्या माध्यमातून पैसे स्वीकारायचे. या सर्वच न्यायाधीशांना सक्तीची निवृत्ती देऊन घरी पाठविण्यात आले आहे. पोरबंदर येथील जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशाला त्यांच्या विचित्र वागणुकीसाठी शिक्षा देण्यात आली आहे.
गुजरात सरकार आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एस. राधाकृष्णन यांच्या या धडाक्याच्या मोहिमेमुळे राज्याच्या विधिवर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. राज्यात सर्वदूर या कारवाईचे स्वागत होत आहे. आता ही कारवाई कनिष्ठ न्यायालयाच्या पातळीवरून उच्च न्यायालयाच्या पातळीवर जावी, म्हणजेच जिल्हा पातळीपासून तर राज्याच्या पातळीपर्यंत न्यायव्यवस्थेला जी कीड लागली आहे, ती दूर करण्यासाठी या कठोर उपाययोजना अमलात याव्यात अशी इच्छा व्यक्त होत आहे. ही इच्छा राज्यातला सर्वसामान्य माणूस व्यक्त करू लागला आहे. त्यांच्या मनातली न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरुद्धची चीड यानिमित्त व्यक्त होत आहे.
गुजरात सरकारने उचललेली पावले संपूर्ण देशभरात अनुसरली जावीत अशी भावना आता व्यक्त होऊ लागली आहे. कारण सर्वदूर न्यायप्रणालीची "अवस्था' हीच आहे. फक्त त्याविरुद्ध आवाज उठविण्याची हिंमत कुणी केली नव्हती. जे दुसऱ्याला न्याय देतात ते स्वत: तेवढी नैतिकता जपत असतीलच असा लोकांच्या मनातला ठाम विश्वास अलीकडे ढळू लागला आहे.
अतिशय स्वच्छ आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या प्रणालीतील लोकांच्या गैरवर्तुणुकीचा तो परिणाम आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात प्रचंड चीड असली तरीही ती व्यक्त करण्याची हिंमत तो करीत नाही. न्यायालयाच्या अवमानाच्या परिघात आपला संताप व्यक्त करायचा कसा, असा प्रश्न त्याच्या समोर उभा असतो. पण गुजरातेत जे घडतेय्‌ ते सामान्य माणसाला हवं आहे. सरकार म्हणा वा मग न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनी उचललेली पावले ही सामान्य माणसाच्या मनाचा वेध घेणारी ठरली आहेत. न्यायालय म्हणजे मंदिर, न्यायदेवता आंधळी असते म्हणूनच ती न्याय देताना भेद करत नाही ही प्रत्येकाच्या मनातली भावना खरी ठरायची असेल, तर या व्यवस्थेला लागलेली कीड स्वच्छ करण्याचे काम कुणीतरी हाती घेण्याची गरज होती. गुजरातने त्यात आघाडी घेतली. देशातल्या इतर राज्यांना असले शहाणपण लवकरात लवकर सुचावे हीच प्रत्येकाची मनीषा असणार आहे.
सामान्यता विकासाची कल्पना मांडताना रस्ते, पाणी, वीज, उद्योग, कृषी याच्यापलीकडे विचार करण्याची गरज सहसा कुणाला वाटत नाही. न्यायप्रणालीकडे वळण्याचा तर विचारही कुणाच्या मनात येत नाही. गुजरात सरकारने या सीमेच्या पलीकडे जाऊन विचार केला, कठोर निर्णय घेतले, तेवढ्याच कठोरतेने त्याची अंमलबजावणी केली, भविष्यात अजूनही बरेच काही करण्याचा निर्धार सरकारने केला आहे. गुजरातेतले हे लोण संपूर्ण देशभरात पसरावे, एवढीच आता अपेक्षा आहे.
सुनील कुहीकर
नागपूर
९८८१७१७८३३

तरुण भारत , नागपुर , २६ जुलाई। ०९

Monday, June 8, 2009

कांग्रेस विजयाचे गौड़बंगाल

संशयास्पद ठरणारे दोन निकाल
शिवगंगामध्ये नेमके काय घडले याची माहिती आता समोर आली आहे. या ठिकाणी अण्णा-द्रमुकचा उमेदवार फक्त दोनशे मतांनी विजयी झाला होता. चिदंबरम्‌ पराभूत झाले होते. या पराजयाला विजयात बदलविण्यासाठी पोस्टल बॅलेटची कल्पना समोर आली. केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल यांच्या अधिकाऱ्यांना कामी लावण्यात आले. शिवगंगातील मतदार शोधण्यात आले आणि काही-शे मतपत्रिकांचा गठ्ठा घेऊन सीमा सुरक्षा दलाचे विशेष विमान रवाना करण्यात आले. पोस्टल बॅलेटचे मतदान व विशेष विमानाचे उड्डाण या दोन्ही घटना शिवगंगात चिदंबरम्‌ पराभूत झाल्यानंतरच्या आहेत. ही एकच बाब शिवगंगा किती "प्रदूषित' झाली होती, हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे, असे मानले जाते.
कॉंग्रेस नेत्या डॉ. श्रीमती सुशीला रोहतगी एक मार्मिक उदाहरण देत. लोकसभा म्हणजे कपामधील चहा, गरमागरम, वाफाळलेला; आणि राज्यसभा म्हणजे बशीत ओतलेला चहा. किंचित थंड झालेला. श्रीमती रोहतगी यांचे हे उदाहरण पुढे चालवायचे झाल्यास- राजधानीतील पत्रकार, स्तंभलेखक, विश्लेषक, समीक्षक यांना "कोल्ड कॉफी' म्हणावे लागेल. जनभावनांची अभिव्यक्ती आणि त्या अभिव्यक्तीचे विश्लेषण यात फार मोठी तफावत व दरी असल्याचे निवडणुकीपूर्वी वाटत होते आणि निवडणुकीनंतर निकालांचे विश्लेषण करतानाही ते जाणवत आहे. डाव्या पक्षांची भूमिका, वरुण गांधी प्रकरण, युवांना प्राधान्य अशी काही कारणे सांगून लोकसभा निवडणूक निकालांचे विश्लेषण केले जाते. पण, नेमके विश्लेषण काय? नवी लोकसभा गठित झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनासाठी खासदार मंडळी राजधानीत आहेत. दोन्ही बाजूच्या जवळपास 50 खासदारांशी चर्चा करण्याची संधी मिळाली. आणि त्यांच्याशी चर्चा करताना एक बाब जाणवली; ती म्हणजे, आपण पराभवाचे जे विश्लेषण करतो- या खासदारांची भूमिका, त्यांचे विश्लेषण नेमके विरुद्ध आहे. या खासदारांचे अनुभव, त्यांच्या मतदारसंघातील व्होटिंग पॅटर्न या बाबी मतदारसंघागणिक बदलणाऱ्या आहेत. या नवनिर्वाचित खासदारांशी जशी चर्चा करता आली, तशी भाजपाच्या एका पराभूत उमेदवाराशी चर्चा झाली. त्याचे नाव रमेश विधुडी. राजधानीत भाजपाला जी एक जागा मिळेल असे मला वाटत होते, ती जागा होती रमेश विधुडींची. रमेश विधुडी हा गुजर नेता. इतर सर्व खासदारांपेक्षा रमेश विधुडीचे विश्लेषण अधिक वास्तववादी वाटले. कारण, रमेश विधुडी मला ओळखत नव्हते. अतिशय निरागसपणे, मोकळेपणे ते बोलले. एका मित्राच्या निवासस्थानी विधुडींची भेट झाली. दोन तास ते जे बोलले ते आहे भाजपाच्या पराभवाचे 90 टक्के सत्य असणारे विश्लेषण.
रमेश विधुडी हे काही फार सुशिक्षित नाहीत. जनतेतून समोर आलेला हा नेता. शेवटी लोकशाहीत जनतेला काय वाटते, हेच महत्त्वाचे व निर्णायक असते आणि म्हणून सर्व पत्रकार व राजधानीतील विश्लेषक यांच्या विश्लेषणापेक्षा विधुडींचे विश्लेषण अधिक समर्पक मानले जाते. कारण, ते स्वत: निवडणूक प्रक्रियेत उमेदवार होते. विधुडींनी केलेल्या विश्लेषणाचा या ठिकाणी उल्लेख करणे उचित होणार नाही. कारण, ते जेव्हा माझ्याशी बोलत होते, तेव्हा आपण एका पत्रकाराशी बोलत आहोत हे त्यांना माहीत नव्हते. त्यामुळे त्यांच्या विश्लेषणाचा संदर्भ देणे, पत्रकारितेच्या मूलभूत सिद्धांताच्या विरुद्ध मानले जाईल.
मुस्लिम मतदार
या निवडणुकीत मुस्लिम मतदारांच्या भूमिकेवर उलट-सुलट चर्चा होत आहे. या पैलूंवर चार नेत्यांशी चर्चा झाली. लालूप्रसाद यादव, मुलायमसिंगांचा मुलगा अखिलेश यादव, भागलपूरचे भाजपा खासदार शहानवाज हुसैन आणि मराठवाड्यातील भाजपा आमदार पाशा पटेल. यातील आश्चर्याची बाब म्हणजे जी भाषा पाशा पटेल बोलत होते, तीच बाब अखिलेश यादव, शहानवाज हुसैन बोलत होते. शहानवाज हुसैन यांना 50 टक्के मुस्लिमांची मते मिळाली. बीड मतदारसंघात गोपीनाथ मुंडेंना हाच अनुभव आला. मी, जेव्हा यावर शंका घेतली, पाशा पटेल यांनी मला मुस्लिम प्रभावाच्या मतदान केंद्रांवरील मतदानाची केंद्रनिहाय आकडेवारी फॅक्सने पाठविली. ती चकित करणारी होती.
80 टक्के मुस्लिम गाव
गाव आडसकर मुंडे
अर्धमसला 179 381
शिरसदेवी 179 369
रामतीर्थ 187 211
शिरसाळा 309 262
मांडवा पठाण 379 399
केज शहर 4390 3331
90 टक्के मुस्लिम गाव
पाथ्रुड 238 254
कडा २३५ 318
पिंपळा 218 270
भाळवणी 312 328
70 टक्के मुस्लिम गाव
रसुलाबाद 78 177
घोंडराई 272 275
ब्रह्मगाव १५० 218
या गावांचा संदर्भ केवळ उदाहरणासाठी दिला आहे. अशा मतदान केंद्रांची संख्या भरपूर आहे. भागलपूरमध्येही शहानवाज हुसैन यांना भरपूर मुस्लिम मते पडली. मग, याचा अर्थ भागलपूर व बीड मतदारसंघात निवडणुकीच्या काळात दूरचित्रवाहिन्या काम करत नव्हत्या, असा काढावयाचा काय? येथे वरुण गांधींचा परिणाम झाला नाही काय? म्हणूनच राजकीय निकष एका फटकाऱ्यात काढावयाचे नसतात. ही एक अतिशय गुंतागुंतीची बाब असल्याने प्रत्येक मतदारसंघानुसार विचार करावा लागेल. असा विचार या स्तंभात करणे शक्य नसल्याने फक्त दोनच मतदारसंघांतील निकालांची चर्चा येथे करीत आहे.
तामिळनाडूतील शिवगंगा
तामिळनाडूतील शिवगंगा लोकसभा मतदारसंघातील निकाल "धक्कादायक' मानला जातो. शिवगंगातून केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम्‌ विजयी झाले आहेत. त्यांनी अण्णाद्रमुकच्या उमेदवारास पराभूत केले. शिवगंगाच्या मतमोजणीत चिदंबरम्‌ पिछाडीवर होते. नंतर ते पराभूत झाले. अण्णाद्रमुकच्या समर्थकांनी फटाके फोडून आपला विजय साजरा केला. हे दृश्य सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांनी दाखविले आणि रात्री उशिरा चिदंबरम्‌ विजयी झाले. हे कसे झाले?
पोस्टल बॅलेट
निवडणुकीत पोस्टल बॅलेट नावाचा एक प्रकार असतो. मतदारसंघाबाहेर राहणाऱ्या मतदारांना मतदानाचा आपला हक्क बजावता यावा यासाठी ही सोय करण्यात आली आहे. निवडणुकीनंतर मतमोजणी सुरू होताना सर्वप्रथम पोस्टल बॅलेट- पोस्टाद्वारे आलेल्या मतांची मोजणी केली जाते. शिवगंगात नेमके उलट झाले. मतमोजणीत पी. चिदंबरम्‌ पराभूत झाल्यानंतर पोस्टाद्वारे आलेल्या मतांची मोजणी करण्यात आली व चिदंबरम्‌ यांना विजयी घोषित करण्यात आले.
विमानाचे लॉगबुक
चिदंबरम्‌ पराभूत होत आहेत याची चिन्हे दिसू लागताच चिदंबरम्‌ यांनी पोस्टल मतांची कल्पना समोर आणली. दक्षिण भारतातील अनेक युवक केंद्रीय पोलिस दलांमध्ये भरती आहेत. राजधानी दिल्लीत तैनात अशा युवकांची संख्या मोठी आहे. शिवगंगातून आलेल्या या युवकांचे पोस्टल बॅलेटद्वारे मतदान घेण्यात आले आणि मतपत्रिकांचा गठ्ठा विशेष विमानाने शिवगंगाला नेण्यात आला. विमानाचे लॉगबुक पाहिल्यानंतर हे सिद्ध करता येते. चिदंबरम्‌ गृहमंत्री, त्यांच्यासाठी मतदान करविण्यात आलेले मतदार, केंद्रीय राखीव दलातील जवान आणि मतपत्रिकांचा गठ्ठा शिवगंगाला नेणारे विमानही भारतीय सीमा सुरक्षा दलाचे. शिवगंगात हा प्रकार घडला. चिदंबरम्‌ यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान दिले जाणार आहेच. पण देशाच्या गृहमंत्र्याने आपल्या मतदारसंघातील निवडणुकीत गैरप्रकार करण्याचा हा पहिलाच प्रकार मानला पाहिजे. कॉंग्रेसमधील नेते दबक्या आवाजात ही बाब मान्य करतात. पक्षातील बहुतेक नेत्यांना पी. चिदंबरम्‌ पराभूत व्हावे, असे वाटत होते. चिदंबरम्‌ विजयी झाल्याचा अण्णाद्रमुकला जेवढा धक्का बसला, त्यापेक्षा मोठा धक्का कॉंग्रेस नेत्यांना बसला, असे म्हटले जाते.
शिवगंगामध्ये नेमके काय घडले याची माहिती आता समोर आली आहे. या ठिकाणी अण्णा-द्रमुकचा उमेदवार फक्त दोनशे मतांनी विजयी झाला होता. चिदंबरम्‌ पराभूत झाले होते. या पराजयाला विजयात बदलविण्यासाठी पोस्टल बॅलेटची कल्पना समोर आली. केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल यांच्या अधिकाऱ्यांना कामी लावण्यात आले. शिवगंगातील मतदार शोधण्यात आले आणि काही-शे मतपत्रिकांचा गठ्ठा घेऊन सीमा सुरक्षा दलाचे विशेष विमान रवाना करण्यात आले. पोस्टल बॅलेटचे मतदान व विशेष विमानाचे उड्डाण या दोन्ही घटना शिवगंगात चिदंबरम्‌ पराभूत झाल्यानंतरच्या आहेत. ही एकच बाब शिवगंगा किती "प्रदूषित' झाली होती, हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे, असे मानले जाते.
अरुणाचल प्रदेश
अरुणाचल प्रदेशातील दोन जागांपैकी एका जागेचा निकाल असाच वादग्रस्त ठरला आहे. येथून भाजपाचे खासदार श्री. किरण रिज्जू यांनी फेरनिवडणूक लढविली होती. श्री. रिज्जू पराभूत झाले. पण, त्यांच्या मतदानाचे आकडे बोलके आहेत. अनेक मतदान केंद्रांवर एकूण मतदारांपेक्षा अधिक मते कॉंग्रेसला मिळाली. म्हणजे एखाद्या मतदान केंद्रावर 500 मतदार असतील, तर येथे जास्तीत जास्त किती मतदान होऊ शकते? अगदी सर्व मतदारांनी मतदान केले हे गृहीत धरले तरी जास्तीत जास्त 500 मते नोंदविली जाऊ शकतात. 501 वे मत तर पडू शकत नाही. कारण, एकूण मतदारच मुळी 500 आहेत. पण, येथे तसे झालेले नाही. ज्या केंद्रावर एकूण मतदार 500 आहेत तेथे 1500 मतदारांनी मतदान केलेले आहे. आणि हे एक-दोन नाही तर पन्नासहून अधिक मतदान केंद्रांवर झालेले आहे. श्री. रिज्जू निवडणूक आयोगाकडे जाऊन आलेत. तेथील अधिकाऱ्यांना या प्रश्नाचे उत्तर देता आलेले नाही. मात्र, यावर अधिक काही बोलण्यास त्यांचा नकार आहे.
इलेक्ट्रॉनिक्स यंत्रे
या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राच्या वापरावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एखादा पक्ष पराभूत झाल्यानंतर त्या पक्षाने असा प्रश्न उपस्थित करणे हास्यास्पद ठरेल. त्याला विश्वसनीयता असणार नाही. पण, अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या शंका उपस्थित करीत आहेत. या शंका-कुशंकांना पुराव्यांचे बळ नसल्याने आज त्यावर काही बोलणे उचित ठरणार नाही. अमेरिकेत या यंत्रांचा वापर करण्यात आला. तेथे न्यायालयात याला आव्हान देण्यात आले. ही यंत्रे "फुल-प्रुफ' नाहीत, असा न्यायालयांचा आदेश आल्यानंतर मतदान यंत्रांचा वापर केला जात असतानाच "पेपर बॅकअप'ही सुरू करण्यात आले. म्हणजे यंत्रांच्या वापरासोबतच मतपत्रिकांचाही वापर करण्यात आला. भारतात काय होते ते पहावयाचे.
रवींद्र दाणी, नवी दिल्ली